Video : आठवलेंच्या स्टाईलनं सुरूवात करत जेव्हा फडणवीस रेडिओ जॉकींना खळखळून हसवतात….

CM Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ (Maharashtra Radio Festival) आणि ‘आशा रेडिओ पुरस्कार (Asha Radio Award) 2025 सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी चक्क आपल्या स्व-रचित कविता ऐकवल्या आणि मी आठवलेंच्या घराण्याचा कवी आहे, असं म्हणत रेडिओ जॉकींना खळखळून हसवलं.
आळंदीत कत्तलखाना होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
LIVE | ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ आणि ‘आशा रेडिओ पुरस्कार 2025’
🕞 दु. ३.१५ वा. | २१-६-२०२५📍मुंबई.#Maharashtra #Mumbai #RadioMahotsav https://t.co/0Nzvvm0LBc
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 21, 2025
मॉडेलिंग हा मित्राने केलेला एक प्रँक
फडणवीस यांची 5 रेडिओ जॉकींनी मुलाखत घेतली. यावेळी अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच स्वरचित कविताही ऐकवल्या. कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्ही मॉडेलिंग केलं, तुम्हाला लिहिण्याचा छंद आहे. तुम्ही गीतकार आणि कवी देखील आहात. तुम्ही पहिल्यांदा काय लिहिलं होतं? काही आठवते का? असा सवाल रेडिओ जॉकीने विचारल्यावर फडणवीस म्हणाले की, सर्वप्रथम मॉडेलिंग हा केवळ अपघात होता. माझ्या मित्राने माझ्यावर एक प्रँक केलं होतं, त्यावेळी हा प्रँक चालला. पण, त्यानंतर मी कधीही मॉडेलिंग करण्याचे धाडस केले नाही. मी केलेले मॉडेलिंग त्यावेळी चांगलंच गाजलं, असंही फडणवीस म्हणाले. जर कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नसते. पण जर माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी असते. माझं मॉडेलिंग म्हणजे माणसाचं कुत्र्याला चावणं होतं, म्हणून ती बातमी झाली, अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली.
ADR Report : लोकसभेसाठी BJP ने 1494 कोटी खर्चले, कॉंग्रेस अन् NCP ने किती खर्च केला?
कविता अनेक केल्या, पण साठवून ठेवल्या नाहीत
पुढं फडणवीस म्हणाले की, मला आधीपासूनच लिहिण्याची आवड होती. मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहायचो. मी कवी संमेलनांना जायचो. मी खूप लहान वयात काही कविता लिहिल्या होत्या. एक गोष्ट म्हणजे कविता लिहिल्यानंतर मी त्या कधीच साठवून ठेवल्या नाहीत. जेव्हा जेव्हा मला वाटायचे तेव्हा मी स्वतः लिहायचो आणि वाचायचो. आता मी अलीकडेच दोन गाणी लिहिली आहेत. एक रामजन्मभूमीच्या वेळी रामावर लिहिलं होतं, तर एक गाणं शंकरावर लिहिलं होतं, असं फडणवीस म्हणाले.
मी रामदास आठवले घराण्याचा कवी
तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे… असं म्हणत मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या कवितेमुळे सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर फडणवीसांनी खालील ओळी ऐकवल्या.
तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो.
नसेना का अर्थ, अनर्थ तर असतो..
तुम्ही काय कविता कराल,
पण आणि किंवा परंतु, अशा अर्थपूर्ण शब्दाचा निरर्थक शाब्दीक गुंता म्हणजे कविता नव्हे
कविता म्हणजे मनाला छेदून गेली पाहिजे
हृदयाला भेदून गेली पाहिजे….
ही कविताही फडणवीसांनी सभागृहातील उपस्थितांना ऐकवली.